करोना नंतर.....
मध्ये वाॅटस् ॲपवर एक चांगली पोस्ट वाचनात आली, डॉक्टर प्रकाश कोयाडे लिखित. त्यात असे म्हटले होते की, कोविड नंतर लोक बदलतील, पुन्हा मिळालेल्या संधीमुळे!! पण त्या भयानक परिस्थिती नंतर आता काय दिसून येत आहे ?? घाणेरडे राजकारण, धर्मकारणच !! शंभर वर्षांपूर्वी युरोपात आलेल्या साथीमुळे तिथे बंद नाले, साफसफाई इत्यादी जे जे चांगले सुरु झाले ते आजतागायत !! त्या लेखात पुढे प्रश्न विचारला होता की पुन्हा जर अशी काही आपत्ती आली तर आपली काय तयारी आहे ?????? खूप अंगावर येणारा लेख,तो ही एका डाॅक्टर ने लिहीलेला, त्यामुळे मन जास्त विषण्ण झाले. कारण खरोखरच करोना मुळे खालावलेल्या आर्थिक, सामाजिक व मुख्य म्हणजे मानसिक स्थितीला पुन्हा वर आणण्यासाठी आपल्याकडे काय उपाय योजले जात आहेत हा एक संशोधनाचाच विषय ठरावा !! भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांत तुलना करण्याइतका माझा अभ्यास नाही पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला माझ्या सामान्य पातळीवर जे काही चांगले दिसते ते नक्कीच नमूद करावेसे वाटते. करोना चा पहिला भर ओसरल्यावर ऑस्ट्रेलियात लोकांना जमिन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सरकारने एक स्कीम काढली,