आनंद
गणपती गजानन आले आहेत. सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. सहाजिकच ह्या आनंदाचा संसर्ग सगळ्यांनाच होतो व सगळीकडे आनंदी वातावरण पसरते. देवळातला जादूचा लोलक अलगद हातात येतो. आनंद ही मनाची भावना आहे. आजूबाजूला जर आनंदी वातावरण असेल तर आपणही त्यात नकळत सामिल होऊन जातो. एकंदरच सगळ्या भावना मनाच्या कारक आहेत. मन आनंदी तर तुम्ही आनंदी !!! एक म्हण आहे.... "Body in abyss, heart in paradise" म्हणजेच तुमची Body/शरीर कितीही खड्ड्यात/ पाताळात/ abyss मध्ये गेलेली असेल पण तुमचे मन / heart जर स्वर्गात / paradise मध्ये असेल तर तुम्हाला खड्ड्यातही सुंदरता, आनंद मिळू शकतो. थोडक्यात काय बाह्य गोष्टींवर आपला आनंद अवलंबून नसतो तर आंतरिक दृष्ट्या जर तुम्ही सुखी, समाधानी असाल तर बाह्य गोष्टींनी काहीही फरक नाही. हे सगळे पटते, वाचायला, ऐकायला आवडते मग घोडे कुठे अडते? तर........मन !!!!! स्वतः रामदास स्वामी ही जिथे म्हणतात... परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझे नावरे आवरिता | तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥ पण तिच करूणाष्टके