कलाविश्व
मराठी टीव्ही मालिकांचे कलाविश्व कोणत्या टप्प्यावर उभे आहे तेच कळत नाहीसे झाले आहे. एक जमाना होता , चित्रहार, गजरा, फक्त काही दिवसांतच संपणाऱ्या मराठी मालिका !! खूप छान दिवस होते ते ! सगळेच घरगुती, कौटुंबिक!! सर्वांनी एकत्र बसून पहावे असे. आता मात्र मराठी मालिकांचे विषय पूर्णपणे बदलेले आहेत. ते आता कोणते वळण घेणार आहेत तेच कळत नाहीये. OTT platform बद्दल तर न बोललेलेच बरा ! सेन्सॉरशिप नसल्यामुळे बेबंदपणे वाटेल ते दाखवता येते. ते असो... मराठी मालिकां बद्दल बोलायचे म्हटले तर उदाहरणार्थ स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका !! यात तर सामुहिक बलात्कार, छोट्या मुलीचे अपहरण इत्यादी दाखवून मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. झी, कलर्स, सोनी, स्टार प्रवाह इत्यादी लोकप्रिय चॅनेलस् वरती सगळीकडे हाच प्रकार सुरू आहे. सगळ्याच मालिका असंबद्धपणे, वास्तव सोडून चालू आहेत, त्या ही अगदी सगळे सदस्य घरात असतात तेव्हा prime time ला !! विवाहबाह्य संबंध, मारामारी, सुनेला छळणे, गुंडागर्दी, थोबाडीत मारणे, स्त्रियांचा अपमान हे सर्व इतके सर्रास झाले आहे