देव
सध्या सगळीकडेच इपिस्टाईन फाईल्स ची चर्चा चालू आहे. अर्थात त्यातले मला काही कळत नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळेच आजच्या लेखाचा तो विषयच नाही. फक्त सांगण्यासारखे एक म्हणजे त्यात ज्या लोकांची नावे सगळीकडे चर्चेत आहेत त्यामुळे धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच बसत आहेत तर सांगण्याचा विषय असा की हे सगळे काय चालत आले आहे...मनाला सुन्न करणारे !!!! अगदी विचार केला तर चेंगीझ खान किंवा त्याआधी पासूनच आणि नंतर ही देशोदेशी झालेले अनेक नरसंहार, ज्यूं चे आणि फाळणीच्या वेळचे नरसंहार आणि आता या फाईल्स मधून उघड होत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे मती कुंठीत झाली आहे, काही कळतच नाहीये.... लहान बाळांपासून स्त्रीपुरूष, म्हातारे कोतारे अगदी सगळ्यांवरचे अत्याचार बघून मन सुन्न होते. कुठे आहे देव ????? खरंच देव आहे का आणि असेल तर एवढ्या भयानक घटना तो घडूच का देत आहे ?? खरंतर मन विषण्ण झाल्यावर सारासार विवेक बुध्दी जागृत होते. सकारात्मक विचारच केले पाहिजेत व अशा भयानक बातम्यांपासून मनाला लांब ठेवले पाहिजे हे कळत...