Posts

मिसिंग टाइल सिंड्रोम

    डेनीन प्रेगर यांनी 'मिसिंग टाइल सिंड्रोम' असे नाव दिलेली एक मानसिक प्रवृत्ती आहे.      म्हणजे व्यक्ती आपल्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींकडे न बघता नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ती व्यक्ती दुःखी होते, मनातल्यामनात कुढत रहाते.      एखादा सुंदर हाॅल असेल,जो हजारो सुंदर टाईल्स नी मढवलेला असेल पण तेथे एक टाइल लावायची राहिली अथवा तुटली असेल तर तेथे येणाऱ्या लोकांचे लक्ष इतर सुंदर टाईल्स पेक्षा त्या नसलेल्या टाइल कडेच जाते.     तसेच एक सुंदर पोहण्याचा तलाव आहे, तेथेही तशीच एक मिसिंग टाइल आहे. तेथेही तेच !! तिकडेच सगळ्यांचे लक्ष जाते.     म्हणजे माणसे सुख सोडून रिकाम्या जागेकडेच, दुःखा कडेच बघतात. ती एक प्रवृत्ती असते.     कितीही यश मिळले, सुख-समाधान असले तरी इतरांच्या आयुष्याशी तुलना करून दुःखी होतात,उदास होतात. त्यामुळे जगण्यातला आनंद हिरावला जातो,मानसिक ताण वाढतो आणि कशातही समाधान मिळत नाही.     अर्थात सगळ्यांना असेच होते असे नाही पण क्वचित प्रसंगी उगाचच उदास वाटते, असमाधानी वाटते. ...

बाॅम्बे टाॅकीज, मालाड

    मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार या भागात सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय व नायिका देविका राणी यांचा बाॅम्बे टाॅकीज हा सिने निर्मितीचा स्टुडिओ होता. खूप सुंदर बांधकाम असलेल्या ह्या अप्रतिम कलाकृती कालौघात नष्ट पावल्या.      पण तिथून थोडे जवळच देविका राणी यांचा खूप सुंदर बंगला होता. जो सोडून जाताना त्यांनी तो मुंबई महानगरपालिकेच्या कन्या शाळेसाठी दिला. एक अगदी सुंदर इमारत अगदी आत्ता आत्ता पर्यंत वापरात होती. मुली तेथे शिकून प्रगती करत होत्या. मी ही त्या बंगल्याचे सौंदर्य जवळून न्याहाळले आहे. त्यामुळेच जेव्हा त्याला तोडले तेव्हा साहजिकच खूप वाईट वाटले. तुटता तुटत नव्हता म्हणे,एवढे मजबूत बांधकाम होते जुन्या काळचे !!        कालौघात नष्ट झालेल्या अशा अनेक इमारतींची उदाहरणे देता येतील कारण आपल्याकडे विकासाच्या नावाखाली अशा खूप गोष्टी होत आहेत. तर असो...आपण चांगल्याच गोष्टी बघूया.      भारतातील खासकरून दक्षिणेकडील मंदिरे पुरातन आणि कलाकुसरीने भरलेली आहेत.      भारतातील तसेच देशाबाहेरील अशी पुरातन सुंदर मंदिरे प्रवीण मो...

इकिगाई

  आमच्या घरासमोरच्या इमारतीत मेंटेनन्सचे काम सुरू होत आहे. त्यासाठी बांबू बांधणारे कामगार त्यांचे काम करत आहेत, नेहमीप्रमाणेच.. बिनधास्त!!!!     त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,ते कामगार इतक्या उंचीवर  इतके बिनधास्त वावरत होते की अगदी मध्येच एखाद्या बांबूवर झुलत बसून फोनही पाहिला एकदा एकाने असे वाटले, हे सगळे पहाताना इकडे माझ्याच काळजाचा ठोका चुकत होता.    हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा अतिरेक झाला आहे. व्हिडिओ, रिल्स बघता बघता तुमचा वेळ कधी, कुठे आणि कसा जातो याचा पत्ताच लागत नाही.शाॅर्टस तर अगदी कोच पोटॅटो करून टाकतात तुमचा !!!!       असो...     यावर एका ठिकाणी असे वाचले की आपण उपास करतो तसाच आठवड्यातून/महिन्यातून एखादा दिवस तरी सोशल मिडीया न बघण्याचा उपास करून बघायचा.खरोखर कल्पना खूप आवडली. कितपत जमते ते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...     असा उपास ही एक उत्तमच गोष्ट आहे पण अजून एक जपानी संकल्पना आहे ती ही खूप आवडली. ती आहे "इकिगाई"...      इकिगाई म्हणजे "a reason for being"- जगण्याचे कारण...

कौतुक

   "जातस्य हि ध्रुवो मृत्यु:"  ( भगवद्गतगीता  २.२७ )     हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनाच माहित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव नक्कीच मृत्यू पावणार आहे.       हे माहित असूनही बहुतांश लोक, (माझ्यासहित), मी,माझे च करत असतात. राग,लोभ सारख्या षड्रिपूं मध्येच अडकून राहिलेले असतात.       स्वत: पलिकडे माणसाला खरचं काही दिसत नाही कां ??       कधीतरी समोरच्याचे मनापासून कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार कमी वेळेला होताना दिसते.     पल्लवी जोशी निवेदन करत होती तो सारेगमप कार्यक्रम आठवतोय ? किती ती छान बोलत असायची !!! सगळ्यांचे कौतुक तिच्या  शब्दाशब्दातून अगदी ओसंडून वाहत असायचे. भले ते लिहून दिलेले असेल पण किती ते खरे आणि छान वाटायचे. लेखकाचेही कौतुक!!!!!       एकंदरीतच आपण भारतीय माणसे भावना व्यक्त करणे कमजोरपणाचेच लक्षण मानतो असे मला वाटते. असो...       तसे तर नाट्यगृहात ही ते वेगळ्याच प्रमाणात दिसते. पुढच्या रांगांमधील प्रेक्षक माफक प्रतिक्रिया देत असतात. तर श...

गीता वचन

    श्रद्धेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर एक क्लीप ऐकण्यात आली.      त्यात असे म्हटले आहे की, श्रद्धेने तुम्ही मेडीटेशन करत असाल तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर, तब्येतीवर होतो.     मेडीटेशन करत असताना चांगल्या विचारांचे, तब्येत ठीक होण्याचे असे काही ठोस ध्येय समोर ठेवून जर तुम्ही मनाची शक्ती वाढवलीत तर तुमचे आरोग्य, मन चांगले रहाते, सुधारते.     त्यासाठी त्या क्लीप मध्ये गीतेच्या  १५  व्या अध्यायातील  ५  व्या श्लोकाचे उच्चारण केले आहे. तुम्ही मनाला  पंचेंद्रियांना जिंकून घेवू शकता इतकी शक्ती मेडीटेशन मध्ये आहे.     गीता अध्याय  १५  श्लोक  ५  वा :  "ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे,ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, जे नित्य परमात्म्याच्या स्वरूपात स्थित आहेत, ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत आणि जे सुख-दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त आहेत, असे ज्ञानी पुरूष त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात." रामकृष्ण हरी 🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

कलीयुगाची पूर्वसूचना

    सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली.      महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले.        अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती.      भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती.      नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले.      सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाट...

अशीच एक गोष्ट

    ती सुंदर राजकन्या आणि बेडूक झालेल्या शापित राजपुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे. छान, गंमतशीर अजिबात नाहीये.      तर आपली ही नवीन राजकन्या अशीच फेरफटका मारत बागेत फिरत असते. तेवढ्यात तिला एक चांगला जाडा,काळपट हिरवा बेडूक तलावाकाठी बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे जाऊ लागते......      तिला जवळ येताना बघून तो मनोमन खूप खुश होतो.....    आता ती येणार,आपल्याला उचलणार आणि आपले तिच्या सुंदर  ओठांनी चुंबन घेताच आपण शापमुक्त होऊ आणि नंतर तिच्याजवळ विवाह करून आपल्या राज्यात राज्य करू....      ती येते,त्याला उचलते आणि स्वतःजवळच्या पिशवीत ठेवते. मग ती घरी येते त्या बेडकाला स्वच्छ धुते, निगुतीने सगळीकडून त्याला छान कापते व त्याच्या मांड्यांचा चमचमीत रस्सा करून चाटून पुसून खाते....    संपली गोष्ट....     मलाही लिहीताना खूप वाईट वाटले पण साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी हा व्यवसाय खूप भरभराटीला आला होता. आताही असेल तर मला माहीत नाही.      बेडकांच्या मांड्या चीनला...