सुग्रीवाज् ॲटलास
श्री प्रभू रामचंद्रांची प्रिय पत्नी सीतामाई यांचे रावणाने अपहरण केल्यानंतर श्रीराम वेड्या सारखे सगळीकडे त्यांना शोधत होते. श्री हनुमानांनी त्यांची भेट सुग्रीवा जवळ करून दिली. त्या काळात ही सुग्रीवाला चारी दिशांची पूर्ण माहिती होती म्हणून त्यांनी चारही दिशांना दूत पाठवून सीतामाईंचा शोध घेण्याचे ठरवले. आणि याच चारी दिशांची माहिती व त्याची आधुनिक ठिकाणांशी घातलेली सांगड म्हणजे हे पुस्तक आहे... सुग्रीवाज् ॲटलास जे मराठीत ही सकाळ प्रकाशन यांच्या तर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत श्री निलेश निळकंठ ओक आणि दिपाली पाटवदकर. श्री निलेश ओक हे आपल्या प्राचीन ग्रंथांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी सखोल अभ्यासानंतर रामायण व महाभारत कधी घडले त्या तारखा, तसेच प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या जन्मतारखा इत्यादी गोष्टी पुराव्यांसहित दाखवून दिल्या आहेत. श्री निलेश ओकांचे या विषयांवरील अनेक व्हिडिओज युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळतात. ...