Posts

जपानी लोककथा

Image
आपल्या भारतातही गावागावातून अनेक लोककथा, पौराणिक कथा सांगितल्या जातात,पिढी दर पिढी त्या ऐकल्या जातात. या गोष्टी मनोरंजनाबरोबरच सामाजिक प्रबोधन, शिक्षण करत समाज घडवत असतात.  अशीच एक जपानी कथा वाचनात आली आणि तिचा शेवट खूपच वेगळा वाटला म्हणून गुगल अनुवादित अशी ती पुढे देत आहे. जपानी पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये (Japanese folklore) ‘फुटाकुची-ओन्ना’ (Futakuchi-onna) चा मराठीत अर्थ "दोन तोंडी स्त्री" असा होतो.हा जपानमधील योकाई (Yōkai) म्हणजेच एक प्रकारचा भूत, राक्षस किंवा अलौकिक प्राण्याचा प्रकार आहे. फुटाकुची-ओन्नाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये: दोन तोंडे: या राक्षसी स्त्रीला दोन तोंडे असतात. एक तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे सामान्य तोंड असते आणि दुसरे मुख्य तोंड तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला, केसांच्या खाली लपलेले असते. मागचे तोंड: डोक्याच्या मागच्या बाजूला कवटी दुभंगून हे दुसरे तोंड तयार होते. या तोंडाला स्वतःचे ओठ, तीक्ष्ण दात आणि जीभ असते.केसांचा वापर: जेव्हा ही स्त्री एकटी असते किंवा तिला भूक लागते, तेव्हा तिचे केस सापासारखे किंवा हातासारखे हलतात आणि अन्न उचलून मागच्या तोंडात भरता...

विन्स्टन चर्चिल

    आता आपण, भारत देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करणार आहोत. या वर्षांमध्ये आपण सर्वच क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहेच आणि त्याचा सार्थ अभिमान ही आहे.        पण सध्या जंतरमंतर वर झालेले युवा पिढीचे निदर्शन, दहीहंडी, गणेशोत्सवातला डीजे चा वापर या घटना मन विषण्ण करतात.       मग चर्चिल चे भारताबद्दल चे मत आठवले, की, भारताला एवढ्यात स्वातंत्र देवू नका. १९४३ मध्ये बंगाल मध्ये तीस लाख माणसे मृत्यूमुखी पडली कारण, चर्चिल आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने लवकर निर्णय न घेतल्यामुळे भयानक दुष्काळ आला तो आठवला मग त्याना जास्त समजून घेण्यासाठी पुनः एकदा त्यांच्यावर आधारलेला Darkest Hour नावाचा सिनेमा प्राइम व्हिडिओ वर बघितला.       युद्धाचे ढग डोक्यावर घोंघावत असतानाच वयाच्या पासष्ट व्या वर्षी चर्चिल याना इंग्लंड चे पंतप्रधान बनवले गेले.       हिटलर सारखा शत्रू समोर होता. देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार होते. मंत्रीमंडळाचा म्हणावा तसा पाठिंबा नव्हता....

विमान विद्या

Image
       काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली. त्यात त्या सद्गृहस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते जसे की, रावणाकडे खरेच विमान होते कां, सीतामाई चे अपहरण करते वेळी ते कुठे उतरवले होते, रामायणानंतर त्याचे काय झाले, नंतरही अवशेष मिळाले का इ.इ.        खरंतर या विषयांवर त्यातील तज्ञांचे एवढे संशोधन उपलब्ध आहे की या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे समजून घेतली तर नक्कीच मिळू शकतील.       माझ्याकडे डॉक्टर प. वि. वर्तक यांची पुस्तके आहेत. त्यातील वास्तव रामायण या पुस्तकात त्यांनी चित्रांसकट या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे.      वाल्मिकी रामायणातील विमाने  खरी आहेत याचे अनेक पुरावे  त्यांनी दिले आहेतच. पण आणखीन एक सात आठ पानांचे एक पूर्ण प्रकरण खास 'भोजराजाची विमानविद्या' या विषयावर आहे.      त्या लेखात शेवटी ते लिहीतात, "महाभारत, रामायण, ऋग्वेद या तिन्ही ठिकाणी विमानांची वर्णने आहेत. श्लोक ८४ येथे भोज म्हणतो की पूर्वीचेच हे ज्ञान मी संकलित करत आहे."       पुढे ते म्हणतात,...

केरोफोबिया

    मध्येच कुठेतरी केरोफोबिया बद्दल वाचनात आले. म्हणून गुगल करून बघितले तर गुगलने सांगितले की :-     केरोफोबिया म्हणजे आनंदाची भिती म्हणजेच आनंदी होण्याविषयी किंवा आनंद व्यक्त करण्याविषयी वाटणारी भिती.       त्याची सामान्य लक्षणे अशी की, मजेपासून दूर राहणे, वाईट नशीबाच्या परिणामांची काळजी करणे, आनंदासाठी दोषी धरणे, इ.      खरंतर इतक्या वाईट पध्दतीने नाही पण थोड्याफार प्रमाणात मी सुध्दा या केरोफोबियाला तोंड दिले आहे.       माझ्या मिस्टरांच्या निधनानंतर काही वर्षांनी आयुष्यात सलग दोन तीन वर्ष वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या समस्या सोडविण्याच्या नादात सामाजिक आयुष्याकडे दुर्लक्ष झाले. आनंदाची भिती वाटू लागले. जोरात हसले तर वाईट नशीबाला तोंड तर द्यावे लागणार नाही नां अशा अनेक वेडगळ कल्पनांनी डोक्यात घर केले होते.       हळूहळू प्राॅब्लेम कमी होत गेले तसतसे डोक्यातील वाईट विचारांचे धुके ही वितळत गेले.       यावर उपाय ही आपोआप सुचत गेले. आवडीच्याच लोकांत मिसळणे, आवडीच...

सुग्रीवाज् ॲटलास

Image
      श्री प्रभू रामचंद्रांची प्रिय पत्नी सीतामाई यांचे रावणाने अपहरण केल्यानंतर श्रीराम वेड्या सारखे सगळीकडे त्यांना शोधत होते.         श्री हनुमानांनी त्यांची भेट सुग्रीवा जवळ करून दिली. त्या काळात ही सुग्रीवाला चारी दिशांची पूर्ण माहिती होती म्हणून त्यांनी चारही दिशांना दूत पाठवून सीतामाईंचा शोध घेण्याचे ठरवले.        आणि याच चारी दिशांची माहिती व त्याची आधुनिक ठिकाणांशी घातलेली सांगड म्हणजे हे पुस्तक आहे... सुग्रीवाज् ॲटलास जे मराठीत ही सकाळ प्रकाशन यांच्या तर्फे प्रकाशित झाले आहे.         या पुस्तकाचे लेखक आहेत श्री निलेश निळकंठ ओक आणि दिपाली पाटवदकर.       श्री निलेश ओक हे आपल्या प्राचीन ग्रंथांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी सखोल अभ्यासानंतर रामायण व महाभारत कधी घडले त्या तारखा, तसेच प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या जन्मतारखा इत्यादी गोष्टी पुराव्यांसहित दाखवून दिल्या आहेत.        श्री निलेश ओकांचे या विषयांवरील अनेक व्हिडिओज युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळतात. ...

गोष्ट समजूतीची

    सगळ्याच नात्यांमधे एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज असते तरच ती टिकून रहातात. रागाने, द्वेष करून नाती टिकत नाहीत. मग ते नवरा  बायकोचे असो वा कुठलेही !!      तर हल्ल्ली किती भयानक बातम्या कानावर पडत आहेत, त्या ऐकूनच अंगावर शहारा येतो.       कुणी ड्रमात तर कुणी फ्रीज मध्ये तर कुणी सुटकेस मध्ये मारून ठेवले नंतर ऐकू आले की एकीने होणाऱ्या नवर्‍याला सरळ गडावरून खालीच ढकलून मारले.       ऐकतानाही किती भयानक वाटते. कसा धजावत असेल जीव अशी भयंकर कृत्ये करायला ? काय मनोधारणा असेल अशा प्रवृत्तींची ?      तर मुद्दा या भयानक लोकांचा नाही तर आमिर खान चा आहे. बघा ना तीन तीन लग्न केली. तिसऱ्या लग्नाला पहिल्या दोन्ही बायका आपापल्या मुलांसहित हजर होत्या, म्हणे !! अर्थात हे सगळे ऐकीवच हं...आपल्याला तर बोलावणे नव्हते बाबा !! तर अजून एक मजा तिसऱ्या लग्नात तिसरी बायको आपल्या पहिल्या मुलाला घेऊनच होती.       त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलीच्या लग्नात दोन्ही घटस्फोटित बायका मस्त नऊवारी नेसून मिरवत होत्या ...

स्विकार

    माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या 'स्वभाव विभाव' पुस्तकात म्हणतात,   जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे,निर्धार दे कराया मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय ?  माझे मला कळाया,दे बुद्धी देवराया  !!      थोडक्यात काय आयुष्यात जे बदलता येत नाही ते स्वीकारायचे आणि जे करता येईल ते चांगल्या पध्दतीने करत राहायचे तरच जीवन सुसह्य होईल.        खरंच किती सत्य आहे पण आपण ते तसे आचरणात आणतो का हे प्रत्येकाने स्वतःशीच पडताळून पहायला हवे.       आता हेच बघा ना वय वाढणे हा नैसर्गिक नियम आहे. शरीरात वयानुसार छोटे-मोठे बदल होतच असतात,ते तसेच आपल्याला स्विकारावेच लागतात. अर्थात वय वाढले तरी मनाने तरुणच रहाण्याचा प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. तरीही जर आपण आपल्या वाढत्या वयाचा ग्रेसफुली स्विकार केला तर आयुष्य आणखीनच सुंदर होवू शकते.        कारण माझ्या माहितीत एक काकू आहेत, डोळ्यांवर केमिकल चा वाईट परिणाम होत असून ही त्या केस काळे करणे थांबवत नाहीयेत. दुसर्‍या आहेत त्यांचे कुठल्याच काम...