इंटरनेट उपवास
परवा आमच्या वसंत फडके नावाच्या मित्राने निर्जला एकादशी बरोबर इंटरनेट उपवास ही केला. ही सुंदर कल्पना मनाला खूपच भावली कारण हया इंटरनेट विस्फोट झालेल्या काळात या गोष्टींची खरंच खूप गरज आहे. कारण फेसबुक,वाॅट्स ॲप,इ.इ. मुळे आपण खरंतर आभासी पध्दतीने जोडले गेलोय पण सर्वार्थाने 'जवळ' आलो आहोत का हा प्रश्नच आहे. कारण फेसबुक वर वगैरे जे दाखवले जाते ते खरंच खरे असते का की नुसता दिखावा असतो ? हे असे म्हणावेसे वाटते कारण सध्या सगळीकडेच चर्चेत असलेली सिया गोयल... तिची सोशल मिडीया वेगळेच काही दाखवत होती आणि घडले काही वेगळेच होते..असो. तुम्ही कोठेही जा, बहुतेक लोकांच्या हातात फोन असतातच. बसथांब्यावर, बागेत अगदी दवाखान्यात ही लोक फोन बघत असतात. रस्त्यातून चालतानाही फोन बघत असतात, त्यातूनच माहीम ला एकावर हल्ला झाला. या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणे कमी झाले आहे, सगळे ऑनलाईन लाईव्ह मात्र असतात. मनोवैज्ञानिकानी हे सगळे काय चालले आहे त्याला नाव दिलेय Loneliness epidemic. "Six Degrees of S...