Posts

गीता वचन

    श्रद्धेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर एक क्लीप ऐकण्यात आली.      त्यात असे म्हटले आहे की, श्रद्धेने तुम्ही मेडीटेशन करत असाल तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर, तब्येतीवर होतो.     मेडीटेशन करत असताना चांगल्या विचारांचे, तब्येत ठीक होण्याचे असे काही ठोस ध्येय समोर ठेवून जर तुम्ही मनाची शक्ती वाढवलीत तर तुमचे आरोग्य, मन चांगले रहाते, सुधारते.     त्यासाठी त्या क्लीप मध्ये गीतेच्या  १५  व्या अध्यायातील  ५  व्या श्लोकाचे उच्चारण केले आहे. तुम्ही मनाला  पंचेंद्रियांना जिंकून घेवू शकता इतकी शक्ती मेडीटेशन मध्ये आहे.     गीता अध्याय  १५  श्लोक  ५  वा :  "ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे,ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, जे नित्य परमात्म्याच्या स्वरूपात स्थित आहेत, ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत आणि जे सुख-दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त आहेत, असे ज्ञानी पुरूष त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात." रामकृष्ण हरी 🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

कलीयुगाची पूर्वसूचना

    सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली.      महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले.        अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती.      भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती.      नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले.      सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाट...

अशीच एक गोष्ट

    ती सुंदर राजकन्या आणि बेडूक झालेल्या शापित राजपुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे. छान, गंमतशीर अजिबात नाहीये.      तर आपली ही नवीन राजकन्या अशीच फेरफटका मारत बागेत फिरत असते. तेवढ्यात तिला एक चांगला जाडा,काळपट हिरवा बेडूक तलावाकाठी बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे जाऊ लागते......      तिला जवळ येताना बघून तो मनोमन खूप खुश होतो.....    आता ती येणार,आपल्याला उचलणार आणि आपले तिच्या सुंदर  ओठांनी चुंबन घेताच आपण शापमुक्त होऊ आणि नंतर तिच्याजवळ विवाह करून आपल्या राज्यात राज्य करू....      ती येते,त्याला उचलते आणि स्वतःजवळच्या पिशवीत ठेवते. मग ती घरी येते त्या बेडकाला स्वच्छ धुते, निगुतीने सगळीकडून त्याला छान कापते व त्याच्या मांड्यांचा चमचमीत रस्सा करून चाटून पुसून खाते....    संपली गोष्ट....     मलाही लिहीताना खूप वाईट वाटले पण साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी हा व्यवसाय खूप भरभराटीला आला होता. आताही असेल तर मला माहीत नाही.      बेडकांच्या मांड्या चीनला...

देव पुनः एकदा

     एपिस्टाईन फाईल्स च्या गदारोळामुळे देव आहे की नाही हा संभ्रम मनात तयार झाला. आणि मनानेच त्याला 'तो' आहेच हे ठाम उत्तर दिले.     आहेच की हो तो माणसा माणसात,  माणसातील चांगुलपणात, प्रेमात  !!!!     हल्ली ॲगनाॅस्टीक लोकांची संख्या वाढली असावी असे वाटते कारण कुठे तरी वाचले की एक सर्वेक्षण झाले त्यात म्हणे पन्नास टक्के लोक agnostic निघाले. म्हणजे त्यांना देव आहे ही वाटत नाही आणि नाही ही...न्यूट्रल, निर्विकार  !!!     यात अजून एक सांगायचे म्हणजे अजून एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे अमेरिकेत agnostic लोकांबरोबरच ऐथिस्ट म्हणजे देवाला न मानणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. आणि हे नक्कीच भितीदायक आहे.    कारण देवच नाही मग कसलेही चांगले वाईट काम करताना भिती कोणाचीच उरत नाही. अज्ञातातला देव बघतोय ही संकल्पनाही माणसाला वाईट मार्गापासून परावृत्त करत होती. पण एकदा देव नाहीच मग काय....कसेही वागा.     त्यामुळेच देव हवाच आणि तो आहेच.    पण आपल्याला सध्या तरी घाबरण्याची भिती नाही. कारण मोठ्या दोन तीन पिढ्या अनेक च...

देव

    सध्या सगळीकडेच इपिस्टाईन फाईल्स ची चर्चा चालू आहे. अर्थात त्यातले मला काही कळत नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळेच आजच्या लेखाचा तो विषयच नाही.     फक्त सांगण्यासारखे एक म्हणजे त्यात ज्या लोकांची नावे सगळीकडे चर्चेत आहेत त्यामुळे धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच बसत आहेत तर सांगण्याचा विषय असा की हे सगळे काय चालत आले आहे...मनाला सुन्न करणारे !!!!     अगदी विचार केला तर चेंगीझ खान किंवा त्याआधी पासूनच आणि नंतर ही देशोदेशी झालेले अनेक नरसंहार, ज्यूं चे आणि फाळणीच्या वेळचे नरसंहार आणि आता या फाईल्स मधून उघड होत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे मती कुंठीत झाली आहे, काही कळतच नाहीये....      लहान बाळांपासून स्त्रीपुरूष, म्हातारे कोतारे अगदी सगळ्यांवरचे अत्याचार बघून मन सुन्न होते.    कुठे आहे देव ????? खरंच देव आहे का आणि असेल तर एवढ्या भयानक घटना तो घडूच का देत आहे ??    खरंतर मन विषण्ण झाल्यावर सारासार विवेक बुध्दी जागृत होते. सकारात्मक विचारच केले पाहिजेत व अशा भयानक बातम्यांपासून मनाला लांब ठेवले पाहिजे हे कळत...

कोकण

   आपल्यातील खूप जणांचे मूळ कोकणाशी जोडले गेले आहे त्यामुळे कोकणाबद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जणांचे तर लहानपण तेथे गेले आहे,त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो.जसे की सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये,अमुक दिवशी तमुक करू नये इ.     रात्री झाडाखाली झोपू नये पण खरतर ही अंधश्रद्धा नाही. कारण रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड सोडतात व ऑक्सिजन घेतात त्यामुळे झाडाखाली झोपणाऱ्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो.    जुन्या लोकांना कदाचित सायन्स माहित नसेल पण निसर्गज्ञान होते.    या सर्व गोष्टींमधून सुचलेली एक गंमतशीर गोष्ट!!! मजेत मजेत वाचा आणि सोडून द्या ही विनंती.    लहानपणी असे ऐकलेले की झोपताना तहान लागली तर तसेच झोपू नये नाहीतर तहानलेला आत्मा पाणी शोधत शरीरातून बाहेर पडतो. खरतर डिहायड्रेशन होते हे खरे कारण !!!!    तर, या गावातल्या काकूंना झोपताना तहान लागली पण उठायचा आळस केला आणि झोपून गेल्या.....     झाले !!! रात्री पडला की हो आत्मा शरीरातून बाहेर....    स्वयंपाकघरात गेला तर नेमकी एक कळश...

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!

Image
      कुणा एका शिल्पकाराने म्हटलंय की, मूर्ती आत असतेच, आम्ही फक्त वरचा जास्तीचा दगड काढून टाकतो.       आपले सद्गुरू वामनराव पै म्हणतात, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' !!!!       म्हणजे थोडक्यात काय तर आपणच आपले जीवन चांगले घडवायचे असते. स्वतःच स्वतःला चांगल्या मार्गावर ठेवायचे असते.     मालाड पश्चिमेला स. वामनराव पै चौकात एक पुतळा आहे, त्याचा फोटो खाली देत आहेच.      त्यात एक माणूस स्वतःच स्वतःला तासून घडवत आहे.     आपणच स्वतःला घडवायचे असते. चांगले-वाईट वागणे आपल्याच हातात असते. नीर-क्षीर विवेकेषु आपणच योग्य निर्णय घ्यायचे असतात.  अर्थात ते नेहमीच साध्य होते असे नाही पण प्रयत्न करत रहायचे.     पाश्चिमात्य देशात एक संकल्पना आहे.    मायकेल एंजेलो इफेक्ट!!!     त्यात म्हटले आहे की, तुमचा सोबती,तुमचे जवळचे लोक तुमचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात.   तुमच्या पार्टनर च्या तुमच्या बरोबर बोलण्याचा, वागणूकीचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असतो.     त्यामुळे आपल...