Posts

सुग्रीवाज् ॲटलास

Image
      श्री प्रभू रामचंद्रांची प्रिय पत्नी सीतामाई यांचे रावणाने अपहरण केल्यानंतर श्रीराम वेड्या सारखे सगळीकडे त्यांना शोधत होते.         श्री हनुमानांनी त्यांची भेट सुग्रीवा जवळ करून दिली. त्या काळात ही सुग्रीवाला चारी दिशांची पूर्ण माहिती होती म्हणून त्यांनी चारही दिशांना दूत पाठवून सीतामाईंचा शोध घेण्याचे ठरवले.        आणि याच चारी दिशांची माहिती व त्याची आधुनिक ठिकाणांशी घातलेली सांगड म्हणजे हे पुस्तक आहे... सुग्रीवाज् ॲटलास जे मराठीत ही सकाळ प्रकाशन यांच्या तर्फे प्रकाशित झाले आहे.         या पुस्तकाचे लेखक आहेत श्री निलेश निळकंठ ओक आणि दिपाली पाटवदकर.       श्री निलेश ओक हे आपल्या प्राचीन ग्रंथांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी सखोल अभ्यासानंतर रामायण व महाभारत कधी घडले त्या तारखा, तसेच प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या जन्मतारखा इत्यादी गोष्टी पुराव्यांसहित दाखवून दिल्या आहेत.        श्री निलेश ओकांचे या विषयांवरील अनेक व्हिडिओज युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळतात. ...

गोष्ट समजूतीची

    सगळ्याच नात्यांमधे एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज असते तरच ती टिकून रहातात. रागाने, द्वेष करून नाती टिकत नाहीत. मग ते नवरा  बायकोचे असो वा कुठलेही !!      तर हल्ल्ली किती भयानक बातम्या कानावर पडत आहेत, त्या ऐकूनच अंगावर शहारा येतो.       कुणी ड्रमात तर कुणी फ्रीज मध्ये तर कुणी सुटकेस मध्ये मारून ठेवले नंतर ऐकू आले की एकीने होणाऱ्या नवर्‍याला सरळ गडावरून खालीच ढकलून मारले.       ऐकतानाही किती भयानक वाटते. कसा धजावत असेल जीव अशी भयंकर कृत्ये करायला ? काय मनोधारणा असेल अशा प्रवृत्तींची ?      तर मुद्दा या भयानक लोकांचा नाही तर आमिर खान चा आहे. बघा ना तीन तीन लग्न केली. तिसऱ्या लग्नाला पहिल्या दोन्ही बायका आपापल्या मुलांसहित हजर होत्या, म्हणे !! अर्थात हे सगळे ऐकीवच हं...आपल्याला तर बोलावणे नव्हते बाबा !! तर अजून एक मजा तिसऱ्या लग्नात तिसरी बायको आपल्या पहिल्या मुलाला घेऊनच होती.       त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलीच्या लग्नात दोन्ही घटस्फोटित बायका मस्त नऊवारी नेसून मिरवत होत्या ...

स्विकार

    माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या 'स्वभाव विभाव' पुस्तकात म्हणतात,   जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे,निर्धार दे कराया मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय ?  माझे मला कळाया,दे बुद्धी देवराया  !!      थोडक्यात काय आयुष्यात जे बदलता येत नाही ते स्वीकारायचे आणि जे करता येईल ते चांगल्या पध्दतीने करत राहायचे तरच जीवन सुसह्य होईल.        खरंच किती सत्य आहे पण आपण ते तसे आचरणात आणतो का हे प्रत्येकाने स्वतःशीच पडताळून पहायला हवे.       आता हेच बघा ना वय वाढणे हा नैसर्गिक नियम आहे. शरीरात वयानुसार छोटे-मोठे बदल होतच असतात,ते तसेच आपल्याला स्विकारावेच लागतात. अर्थात वय वाढले तरी मनाने तरुणच रहाण्याचा प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. तरीही जर आपण आपल्या वाढत्या वयाचा ग्रेसफुली स्विकार केला तर आयुष्य आणखीनच सुंदर होवू शकते.        कारण माझ्या माहितीत एक काकू आहेत, डोळ्यांवर केमिकल चा वाईट परिणाम होत असून ही त्या केस काळे करणे थांबवत नाहीयेत. दुसर्‍या आहेत त्यांचे कुठल्याच काम...

फिबोनाची

Image
   निसर्गात आपण बघतो तर निरनिराळ्या फुले,पाने,झाडे यांना एक विशिष्ट रचना असते. काही फुले तीन पाकळ्यांची तर काही पाच पण एकाच प्रकारच्या फुलांची एकच रचना !!     तेच पानांचे, फळांचे, झाडांचे अगदी शंख, शिंपले आणि समुद्राच्या लाटांचे ही.      उत्सुकतेपोटी ह्या रचनांमागचे गूढ शोधण्यासाठी गुगल वरती शोधले आणि त्यावर मिळालेली खालील माहिती खूपच रंजक आहे.      फिबोनाची क्रममालिका म्हणजे गणित आणि निसर्गात आढळणाऱ्या संख्यांचा विशेष क्रम आहे. ज्यामध्ये पुढील संख्या ही तिच्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज करून मिळते. हा क्रम 0 आणि १ पासून सुरू होतो. 0, १, १, २, ३, ५, ८, १३ आणि पुढे अनंत काळ चालतो.       या पध्दतीचा उगम भारतात झाला. इ.स. २00 मध्ये सर्वप्रथम पिंगला या प्राचीन भारतीय संगीतकार आणि गणिततज्ञ यांच्या  कार्यात आढळला. त्यानंतर इ.स. ६ ते ८ आणि १२ व्या शतकात विरंहक आणि जैन विद्वान हेमंतचंद्र या विद्वानांनी हा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे नोंदवला.      फुलांच्या पाकळ्यांची संख्या याच फि...

खरे-खोटे

    "सोम साळी, मंगळ जाळी        बुध, भेसा नवं नेसा         शुक्रवारी काय पुसा         शनी साडा कधी न पडे खाडा" नवीन वस्र कोणत्या दिवशी परिधान करावे ते सांगणारे हे एक लोकगीत.  तशीच अजून एक मजा, घरापुढे, अंगणात वगैरे किती साळुंख्या दिसतात त्यावर पण इंग्रजीतून..        One for sorrow         Two for joy        Three for letter and        Four for boy.      म्हणजे या सगळ्या लोकगीत,  गाणी-गप्पा आणि त्यावर असणाऱ्या (अंध) श्रध्दा अगदी युनिव्हर्सल आहेत तर !!       मजा सोडून देवूयात  पण अजून ही या वयात देखील नवीन साडी अथवा ड्रेस घालायचा म्हटला की आज काय वार आहे हे बघितले जाते. अर्थात त्याचे किती पालन होते तो मुद्दा अलाहिदा...      तेच साळुंख्यांबद्दल. त्या दिसल्यावर अगोदर ती वरील कविता आठवते. आणि एकच दिसली की मनाला उगाचच चुटपुट लागते. नंतर दिवसभरात कामाच्या गडबडीत ती विसरली ही जा...

वेद-पुराणे

      एका ठिकाणी वाचले होते की भारतीय परंपरेनुसार शिष्याने गुरूंना प्रश्न विचारायचे नसतात. गुरू जी आज्ञा करतील ती शिरसावंद्य मानायची.       याउलट एका शास्त्रज्ञाची गोष्ट वाचली होती. ते शाळेत जाणारा मुलगा असताना त्यांची आई रोज ते शाळेतून घरी आले की एक प्रश्न विचारायची, आज तू शिक्षकांना काय प्रश्न विचारलास. त्यामुळेच त्या जिज्ञासेतून, कुतूहलातून एक शास्त्रज्ञ जन्माला आला.      अनेकवेळा पाहूनही समाधान न झालेले दोन इंग्लिश सिनेमे आहेत,  Avatar पहिला आणि Doctor Strange.          हे दोनही पिक्चर मला आपल्या संस्कृतीशी खूप जवळचे वाटतात. मला नक्की असे वाटते की त्या सिनेमांच्या लेखकांनी आपल्या वेद  पुराणांचा नक्कीच अभ्यास केला असावा. अवतार मध्ये दाखवलेला परकाया प्रवेश आणि डॉक्टर स्ट्रेंज मध्ये दाखवलेली श्रीयंत्र सदृश्य दृश्ये तसेच आपल्या शरीरातील सात आज्ञाचक्रांचा उल्लेख बघून मला तरी तसे वाटते.       अजून ही प्रेमकथां मध्येच अडकलेल्या बाॅलीवूड बद्दल न बोललेलेच बरे. साऊथ बद्दल विशेष माहिती नाही पण क...

अनामिक भिती

      नरसापूर मधील चिमुरडी च्या भयंकर अत्याचार दुर्घटनेतून जरा सावरतोय तेवढ्यात ट्रेन मधील मयांक लोहार आणि लोहगडावरील केतन अगरवाल दुर्घटना लागोपाठ डोक्यावर आदळल्या.       मन विषण्ण झाले आणि विचारशक्ती सुन्न पडली. आणि पुनः एकदा त्या अनामिक भितीने डोके वर काढले. काय चालले हे सगळीकडे ?? अशिक्षिता पासून सुशिक्षिता पर्यंत सगळे तसेच...कुणीच सुसंस्कृत नाही का ? या सगळ्यात एक वाईट गोष्ट घडताना दिसत आहे ती म्हणजे माणसांचा एकमेकांवरील विश्वास ढळू लागला आहे.      माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर घरात आम्ही दोघीच.. मी आणि माझी मुलगी. रात्रंदिवस बेचैनी असे. तरूण मुलगी आणि मी ही शेवटी बाईच !! आयुष्यात कधी नव्हे ती बाईपणाची भिती वाटत असे तेव्हा... अनेक वर्षं नोकरीनिमित्त घराबाहेर पडून ही...      बॅक, शेअर्स इत्यादी कामासंदर्भात कधीतरी कुणी येत असेच. तसेच  प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारख्या माणसांची ही गरज असतेच.       अर्थात चांगलीच माणसे मिळत गेली आणि भितीही नाहीशी झाली.    पण नुसता मोबाईल ला धक्का लागला तर माही...