Posts

इंटरनेट उपवास

     परवा आमच्या वसंत फडके नावाच्या मित्राने निर्जला एकादशी बरोबर इंटरनेट उपवास ही केला. ही सुंदर कल्पना मनाला खूपच भावली कारण हया इंटरनेट विस्फोट झालेल्या काळात या गोष्टींची खरंच खूप गरज आहे.       कारण फेसबुक,वाॅट्स ॲप,इ.इ. मुळे आपण खरंतर आभासी पध्दतीने जोडले गेलोय पण सर्वार्थाने 'जवळ' आलो आहोत का हा प्रश्नच आहे.       कारण फेसबुक वर वगैरे जे दाखवले जाते ते खरंच खरे असते का की नुसता दिखावा असतो ? हे असे म्हणावेसे वाटते कारण सध्या सगळीकडेच चर्चेत असलेली सिया गोयल... तिची सोशल मिडीया वेगळेच काही दाखवत होती आणि घडले काही वेगळेच होते..असो.      तुम्ही कोठेही जा, बहुतेक लोकांच्या हातात फोन असतातच.  बसथांब्यावर, बागेत अगदी दवाखान्यात ही लोक फोन बघत असतात. रस्त्यातून चालतानाही फोन बघत असतात, त्यातूनच माहीम ला एकावर हल्ला झाला. या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणे कमी झाले आहे, सगळे ऑनलाईन लाईव्ह मात्र असतात.     मनोवैज्ञानिकानी हे सगळे काय चालले आहे त्याला नाव दिलेय Loneliness epidemic.     "Six Degrees of S...

Made in India: a TITAN story

    एक अप्रतिम कलाकृती म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे Prime video/MX Player या OTT चॅनेल वर सुरू असलेली ही मालिका.       महनीय जे.आर.डी. टाटांना स्वित्झर्लंड मध्ये ऐकवले गेले की, तुमच्या भारतात चांगली घड्याळे बनणे शक्य नाही.... आणि येथूनच स्फुलींग पेटले आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास. त्या वर विनय कामथ या लेखकांनी वरील पुस्तक लिहिले आणि त्याची बनलेली गोष्ट म्हणजे ही एक उत्तम वेब सेरीज.       या मालिकेतील प्रत्येक अगदी प्रत्येक कलाकर हा त्या भुमिके साठीच बनला आहे इतके उत्कृष्ट काम प्रत्येकाने केले आहे. कुणा एकाचे कौतुक करावे तर दुसर्‍यांवर अन्याय होईल. प्रत्येक पात्राच्या व्यक्तीरेखेत तुम्ही अक्षरशः गुंतून जाता,इतकी प्रभावी कामे केली आहेत.       "टाटा" हे नावच इतके मोठ्ठे, वलयांकित आहे की त्यावर आपण कलाकृती करत आहोत याचे उत्कृष्ट भान निर्मात्या पासून ही मालिका बनवणाऱ्या प्रत्येकाला आहे. आणि ही जाणीव इतकी तीव्र आहे की मालिकेची प्रत्येक फ्रेम केवळ बघत रहावी अशी झाली आहे. अनेकदा आनंदाने शरीरावर रोमांच उभे रहातात तर क...

॥ ईश्वराची दया ॥

   डोळ्यांनी बघतो, ध्वनी परीसतो कानी, पायी पदी चालतो ।     जिव्हेने रस चाखतो,मधुरही  वाचा मुखी बोलतो ।     हाताने बहुसाळ काम करतो विश्रांती ही घ्यावया ।     घेतो झोप सुखे, फिरूनी उठती ही ईश्वराची दया ॥      या एका श्लोकात त्या ईश्वराची किमया सांगितली आहे. किती त्या जगन्नीयंता बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. कारण केवढे ते आश्चर्य आहे, त्या 'अज्ञाता' वर गाढ विश्वास ठेवून आपण गाढ झोपून जातो.. उद्या नक्कीच उठण्यासाठी..     आणि ही त्याची जादूगारी फक्त माणसांबाबतच नाहीये तर जगातील सर्व प्राणी,पक्षी,वनस्पती इ.इ. सगळ्याच सजीव निर्जीव गोष्टींबाबत आहे.       पावश्या पक्षी माहित आहे नां? पाऊस जवळ आला की 'पेरते व्हा' असे ओरडत शेतकऱ्यांना पेरणीचा इशारा देतो. कुठून त्याला हे ज्ञान मिळते की पाऊस लवकरच पडणार आहे.        पाऊस जवळ येण्या आधीच सगळ्याच पक्ष्यांची घरटे बांधण्याची घाई उडते. मुंग्यांचा सुळसुळाट होतो, पावसा आधी वारूळात धान्य भरण्यासाठी !!!       मारूती चित्तमपल्ली...

कबुतर

    माझ्या मुलीने कबुतरा बद्दल एक गोष्ट सांगितली आणि मला ती खूपच पटली. कबुतरा बद्दल खूप वाईट ही वाटले.     माणसाने सुमारे ५ ते १० हजार वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी कबुतराला माणसाळवले. गुगलबाबा सांगतो याची सुरुवात मेसोपेटोमिया येथून झाली. माणसाळवलेला तो सर्वात पहिला पक्षी आहे. मग ती रानावनात न रहाता, माणसांनी बनवून दिलेल्या घरात म्हणजेच खुराडी, पिंजरे अशाच ठिकाणी राहू लागली. माणसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांची काळजी ही घेत होती व खायला प्यायला ही देत होती.        हळूहळू दळणवळणाची नवनवीन साधने उपलब्ध झाली आणि कबुतरांची गरज संपली. माणसांनी त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. मग ती घरांच्या आडोशाला वगैरे राहू लागली. वर्षांनुवर्षांच्या गुलामगिरीमुळे ती झाडांवर घरटी बांधणे विसरूनच गेली होती. अशातच माणसांनीच त्यांच्यासाठी कबुतरखाने बनवले आणि त्यांच्या रहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली. तशीही माणसांजवळ रहाण्याची सवय असल्यामुळे ,ती माणसांच्या आसपासच घुटमळत राहिली.      वाढत्या प्रदुषणात, कबुतरांमुळेही श्वसनविकार होतात याच...

मदत

    काल वाॅटस् ॲप वर एक गोष्ट वाचनात आली. एक महिला आजारी असते. ती एकदा अचानकपणे तिच्या वर्गमित्राला भेटते. आता शाळा सोडून जवळपास पन्नास वर्षं उलटून गेलेली असतात. तरीही तो आधुनिक सोशल मिडीयाच्या मदतीने वर्गातील जमतील तेवढ्या मित्र मैत्रीणींचा गृप बनवतो. त्या आजारी मैत्रीणीच्या नकळत,ती दुखावली जाणार नाही अशा पध्दतीने,तिच्या नवर्‍याच्याच मदतीने जवळच एक गेटटुगेदर ठरवतात.      ती सर्वांना भेटते. खूप खुश होते. मित्र मैत्रीणींची मनापासून केलेली मेहनत कामी येते. नंतर जमेल तशी मदत सगळेजण तिला करू लागतात. नवर्‍याच्या उत्तम सांपत्तिक स्थिती मुळे तसा पैशाचा प्रश्न नसतो. हवी असते ती शारीरिक आणि मुख्य म्हणजे मानसिक साथ !! ती मिळाल्यामुळे हळूहळू तिची तब्येत बर्‍यापैकी सुधारू लागते.      ही गोष्ट वाॅट्स ॲप वर आलेली... किती खरी,किती खोटी माहित नाही. पण संकल्पना खूप आवडली.     सलील कुलकर्णी यांचा एक लेख वाचनात आला होता. पुण्यात खूपसे पालक एकटे राहतात. कारण मुले परदेशी अथवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात म्हणून. मग पुण्यात अशी एक संस्था आहे जी अशा व...

संभव-असंभव

      श्रीमद्भगवतगीता अध्याय २ श्लोक २३: नैनं छिन्दन्ति शस्राणि, नैनं दहति पावकः | न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारूतः || हा श्लोक सर्वांनाच माहित आहे. आत्मा अमर आहे,तो पुनः पुनः शरीर बदलत असतो,त्याला मरण नाही.    हे अबाधित सत्य असले तरी आपले जीवन मात्र क्षणभंगुर, नश्वर आहे. आपण आज आहोत तर उद्याची शाश्वती नाही हे त्रिकालाबाधित सत्य मनुष्य जन्माला येतो तेव्हाच ठरलेले असते. तरीही आपण राग-लोभ, हेवेदावे,तुझे,माझे करण्यात आणि जीवनाच्या आसक्तीतच अडकून पडलेले असतो. माझा उद्या नक्कीच उजाडेल हे किती सहजपणे आपण गृहीत धरून चालत असतो !!!       साधारण २००७ - २००९ मध्ये झी वाहिनीवर "असंभव" नावाची एक अद्भुत मालिका लागत असे त्याची आठवण आली. तशी ती आत्ताही युट्यूब वर उपलब्ध आहेच. त्याचे शीर्षकगीत असे होते - दिवसामागूनी रात्र धावते, सकाळ संध्याकाळ,  सूत्रधार या साऱ्या चा नाव तयाचे काय ?  काय तयाच्या मनात दडले, न कळे कधी,कुणा क्षणात होते संभव सारे, क्षणापूर्वीचे असंभव!!      खरंच कोण आहे तो सूत्रधार, जो हा जगाचा पसारा निर्विकारपणे चा...

मिसिंग टाइल सिंड्रोम

    डेनीन प्रेगर यांनी 'मिसिंग टाइल सिंड्रोम' असे नाव दिलेली एक मानसिक प्रवृत्ती आहे.      म्हणजे व्यक्ती आपल्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींकडे न बघता नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ती व्यक्ती दुःखी होते, मनातल्यामनात कुढत रहाते.      एखादा सुंदर हाॅल असेल,जो हजारो सुंदर टाईल्स नी मढवलेला असेल पण तेथे एक टाइल लावायची राहिली अथवा तुटली असेल तर तेथे येणाऱ्या लोकांचे लक्ष इतर सुंदर टाईल्स पेक्षा त्या नसलेल्या टाइल कडेच जाते.     तसेच एक सुंदर पोहण्याचा तलाव आहे, तेथेही तशीच एक मिसिंग टाइल आहे. तेथेही तेच !! तिकडेच सगळ्यांचे लक्ष जाते.     म्हणजे माणसे सुख सोडून रिकाम्या जागेकडेच, दुःखा कडेच बघतात. ती एक प्रवृत्ती असते.     कितीही यश मिळले, सुख-समाधान असले तरी इतरांच्या आयुष्याशी तुलना करून दुःखी होतात,उदास होतात. त्यामुळे जगण्यातला आनंद हिरावला जातो,मानसिक ताण वाढतो आणि कशातही समाधान मिळत नाही.     अर्थात सगळ्यांना असेच होते असे नाही पण क्वचित प्रसंगी उगाचच उदास वाटते, असमाधानी वाटते. ...