Posts

कोकण

   आपल्यातील खूप जणांचे मूळ कोकणाशी जोडले गेले आहे त्यामुळे कोकणाबद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जणांचे तर लहानपण तेथे गेले आहे,त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो.जसे की सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये,अमुक दिवशी तमुक करू नये इ.     रात्री झाडाखाली झोपू नये पण खरतर ही अंधश्रद्धा नाही. कारण रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड सोडतात व ऑक्सिजन घेतात त्यामुळे झाडाखाली झोपणाऱ्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो.    जुन्या लोकांना कदाचित सायन्स माहित नसेल पण निसर्गज्ञान होते.    या सर्व गोष्टींमधून सुचलेली एक गंमतशीर गोष्ट!!! मजेत मजेत वाचा आणि सोडून द्या ही विनंती.    लहानपणी असे ऐकलेले की झोपताना तहान लागली तर तसेच झोपू नये नाहीतर तहानलेला आत्मा पाणी शोधत शरीरातून बाहेर पडतो. खरतर डिहायड्रेशन होते हे खरे कारण !!!!    तर, या गावातल्या काकूंना झोपताना तहान लागली पण उठायचा आळस केला आणि झोपून गेल्या.....     झाले !!! रात्री पडला की हो आत्मा शरीरातून बाहेर....    स्वयंपाकघरात गेला तर नेमकी एक कळश...

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!

Image
      कुणा एका शिल्पकाराने म्हटलंय की, मूर्ती आत असतेच, आम्ही फक्त वरचा जास्तीचा दगड काढून टाकतो.       आपले सद्गुरू वामनराव पै म्हणतात, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' !!!!       म्हणजे थोडक्यात काय तर आपणच आपले जीवन चांगले घडवायचे असते. स्वतःच स्वतःला चांगल्या मार्गावर ठेवायचे असते.     मालाड पश्चिमेला स. वामनराव पै चौकात एक पुतळा आहे, त्याचा फोटो खाली देत आहेच.      त्यात एक माणूस स्वतःच स्वतःला तासून घडवत आहे.     आपणच स्वतःला घडवायचे असते. चांगले-वाईट वागणे आपल्याच हातात असते. नीर-क्षीर विवेकेषु आपणच योग्य निर्णय घ्यायचे असतात.  अर्थात ते नेहमीच साध्य होते असे नाही पण प्रयत्न करत रहायचे.     पाश्चिमात्य देशात एक संकल्पना आहे.    मायकेल एंजेलो इफेक्ट!!!     त्यात म्हटले आहे की, तुमचा सोबती,तुमचे जवळचे लोक तुमचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात.   तुमच्या पार्टनर च्या तुमच्या बरोबर बोलण्याचा, वागणूकीचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असतो.     त्यामुळे आपल...

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

     लापता लेडीज पुनः एकदा बघितला,समजून उमजून!!! इराणी सिनेमाची काॅपी आहे,इ.इ. सगळ्यांनाच स्टोरी माहीत असूनही एक सांगावेसे वाटते की सिनेमा खूपच छान आहे....खरा, माणुसकीचे दर्शन घडवणारा.       या सिनेमातील मुली खूप शिकल्या सवरलेल्या नाहीत, वयाने, अनुभवानेही अबोध आहेत पण त्या 'खऱ्या ' आहेत. स्वत्व जपून आहेत.     असो.... तर महत्वाचे काय तर या सिनेमाने  खरी स्त्रीशक्ती दाखवली आहे.       एकदम छोटीशी गोष्ट, चुकून सून म्हणून आलेली मुलगी त्या सासूला स्वत:ला आवडणारी भाजी करायला लावते. खरंतर किती जणी आपली स्वत:ची आवड जपतात?? त्यामुळेच तो प्रसंग गोड वाटतो.      तीच चुकून आलेली मुलगी मग शेतीत मदत करते, त्या नवर्‍याचे दुःख बघून, पळून न जाता, वहिनीतील चित्रकलेतील आवड ओळखून चित्र काढून घेते. ते xerox काढून circulate करविते...      ही इकडे अशी धडपड करत असते तर हरवलेली मुलगीही नवरा शोधत आला की आपल्याला ओळखावे म्हणून साडी ही न बदलता, स्वतःच्या पायावर आशेने उभी रहाण्याचा प्रयत्न करत असते आणि नवरा येणारच या ज...

अलीबाबाची गुहा..

   टीव्हीवरील निरर्थक मालिकांना कंटाळून का होईना मी अचानक युट्यूब कडे वळले.   म्हणजे तसे स्मिता ओक,मधुरा रेसिपी, विष्णू मनोहर, Bristi home, Hebbars Kitchen, IamBhagyashri इत्यादींच्या रेसिपीज बघून घरच्यांवर प्रयोग करत होतेच पण युट्यूब 'ऐकत' नव्हते.    आणि मग मला अलीबाबाची गुहा उघडावी तसा एक खूप सुंदर खजिना गवसला. आणि नंतर मी युट्यूब वरच्या मुलाखतींमध्ये अक्षरशः गुंगून गेले. किती ऐकू आणि किती नको असे होऊन गेले.     प्राध्यापक प्र.के. घाणेकर अत्यंत बहुआयामि व्यक्तिमत्त्व!!! गड, किल्ले,  मंदिरे, मूर्ती, वनस्पती इत्यादी,इत्यादी ...किती ऐकावे तेवढे थोडेच.    'घातसूत्र ' कार दीपक करंजीकर (@deepakkaranjikar) यांची व्याख्याने तर थक्क करून टाकतात. त्यांनी केलेले संशोधन, विश्लेषण ऐकताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो.       तसेच निलेश ओक (@nileshoak5561) यांचे...त्यांचे महाभारत,  रामायणा वरील संशोधन असेच थक्क करणारे. अनेक गोष्टींचा शोध लागल्याचा आनंद मिळतो. तीच गोष्ट प्रवीण मोहन यांच्या व्हिडिओंची.      कि...

अभंगाचा गाथा १३

     देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥      देवाच्या प्रसादाचे ग्रहण कराल तर तुम्ही नक्कीच अधिकारी व्हाल. संतांच्या उष्टयाचे सेवन करा,त्याला कमी लेखू नका. त्याचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. इथे सर्वांची इच्छा पुरविणारा विठ्ठल आहे. या प्रसादाचा आनंद चिरकाल टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते.       तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते , तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा. 🙏 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी 🙏🙏

अभंगाचा गाथा १२

      जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥ दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥      सगळ्या पत्रावळी झाडून, संतांच्या ज्ञानरूपी उष्टया भोजनाचा आस्वाद घ्या. मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे.आमच्याकडे आपपरभाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीशी उभा आहे. मी संतांच्या उष्टयाची इच्छा बाळगून आहे.म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये.      तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या मनाची ही अपेक्षा पूर्ण केली आहे.  रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी ॥ वीणा कुलकर्णी  🙏🙏

अभंगाचा गाथा ११

       पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥       जे संत पुढे गेले आहेत त्यांचा मार्ग शोधत, त्यांच्या मागे जाऊया. त्यांच्या पावलांच्या धुळीला वंदन करून, त्यांचे उष्टे सेवन करू. त्या मुळे आपल्या पूर्व कर्मांची होळी होईल. हे अनुपम असे ज्ञानाचे भांडवल पदरी बांधून घेऊ व विठ्ठलाला शरण जाऊ. गोविंदाच्या केवळ नामस्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील. जन्म मरणाच्या फेऱ्या संपतील व संत सहवासामुळे हा जन्म सार्थकी लागेल.         तुकाराम महाराज म्हणतात,  या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा  लाभ होईल.  बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,   श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी...