कबुतर
माझ्या मुलीने कबुतरा बद्दल एक गोष्ट सांगितली आणि मला ती खूपच पटली. कबुतरा बद्दल खूप वाईट ही वाटले. माणसाने सुमारे ५ ते १० हजार वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी कबुतराला माणसाळवले. गुगलबाबा सांगतो याची सुरुवात मेसोपेटोमिया येथून झाली. माणसाळवलेला तो सर्वात पहिला पक्षी आहे. मग ती रानावनात न रहाता, माणसांनी बनवून दिलेल्या घरात म्हणजेच खुराडी, पिंजरे अशाच ठिकाणी राहू लागली. माणसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांची काळजी ही घेत होती व खायला प्यायला ही देत होती. हळूहळू दळणवळणाची नवनवीन साधने उपलब्ध झाली आणि कबुतरांची गरज संपली. माणसांनी त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. मग ती घरांच्या आडोशाला वगैरे राहू लागली. वर्षांनुवर्षांच्या गुलामगिरीमुळे ती झाडांवर घरटी बांधणे विसरूनच गेली होती. अशातच माणसांनीच त्यांच्यासाठी कबुतरखाने बनवले आणि त्यांच्या रहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली. तशीही माणसांजवळ रहाण्याची सवय असल्यामुळे ,ती माणसांच्या आसपासच घुटमळत राहिली. वाढत्या प्रदुषणात, कबुतरांमुळेही श्वसनविकार होतात याच...