कलीयुगाची पूर्वसूचना
सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली. महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले. अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती. भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती. नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले. सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाट...