Posts

कबुतर

    माझ्या मुलीने कबुतरा बद्दल एक गोष्ट सांगितली आणि मला ती खूपच पटली. कबुतरा बद्दल खूप वाईट ही वाटले.     माणसाने सुमारे ५ ते १० हजार वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी कबुतराला माणसाळवले. गुगलबाबा सांगतो याची सुरुवात मेसोपेटोमिया येथून झाली. माणसाळवलेला तो सर्वात पहिला पक्षी आहे. मग ती रानावनात न रहाता, माणसांनी बनवून दिलेल्या घरात म्हणजेच खुराडी, पिंजरे अशाच ठिकाणी राहू लागली. माणसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांची काळजी ही घेत होती व खायला प्यायला ही देत होती.        हळूहळू दळणवळणाची नवनवीन साधने उपलब्ध झाली आणि कबुतरांची गरज संपली. माणसांनी त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. मग ती घरांच्या आडोशाला वगैरे राहू लागली. वर्षांनुवर्षांच्या गुलामगिरीमुळे ती झाडांवर घरटी बांधणे विसरूनच गेली होती. अशातच माणसांनीच त्यांच्यासाठी कबुतरखाने बनवले आणि त्यांच्या रहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली. तशीही माणसांजवळ रहाण्याची सवय असल्यामुळे ,ती माणसांच्या आसपासच घुटमळत राहिली.      वाढत्या प्रदुषणात, कबुतरांमुळेही श्वसनविकार होतात याच...

मदत

    काल वाॅटस् ॲप वर एक गोष्ट वाचनात आली. एक महिला आजारी असते. ती एकदा अचानकपणे तिच्या वर्गमित्राला भेटते. आता शाळा सोडून जवळपास पन्नास वर्षं उलटून गेलेली असतात. तरीही तो आधुनिक सोशल मिडीयाच्या मदतीने वर्गातील जमतील तेवढ्या मित्र मैत्रीणींचा गृप बनवतो. त्या आजारी मैत्रीणीच्या नकळत,ती दुखावली जाणार नाही अशा पध्दतीने,तिच्या नवर्‍याच्याच मदतीने जवळच एक गेटटुगेदर ठरवतात.      ती सर्वांना भेटते. खूप खुश होते. मित्र मैत्रीणींची मनापासून केलेली मेहनत कामी येते. नंतर जमेल तशी मदत सगळेजण तिला करू लागतात. नवर्‍याच्या उत्तम सांपत्तिक स्थिती मुळे तसा पैशाचा प्रश्न नसतो. हवी असते ती शारीरिक आणि मुख्य म्हणजे मानसिक साथ !! ती मिळाल्यामुळे हळूहळू तिची तब्येत बर्‍यापैकी सुधारू लागते.      ही गोष्ट वाॅट्स ॲप वर आलेली... किती खरी,किती खोटी माहित नाही. पण संकल्पना खूप आवडली.     सलील कुलकर्णी यांचा एक लेख वाचनात आला होता. पुण्यात खूपसे पालक एकटे राहतात. कारण मुले परदेशी अथवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात म्हणून. मग पुण्यात अशी एक संस्था आहे जी अशा व...

संभव-असंभव

      श्रीमद्भगवतगीता अध्याय २ श्लोक २३: नैनं छिन्दन्ति शस्राणि, नैनं दहति पावकः | न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारूतः || हा श्लोक सर्वांनाच माहित आहे. आत्मा अमर आहे,तो पुनः पुनः शरीर बदलत असतो,त्याला मरण नाही.    हे अबाधित सत्य असले तरी आपले जीवन मात्र क्षणभंगुर, नश्वर आहे. आपण आज आहोत तर उद्याची शाश्वती नाही हे त्रिकालाबाधित सत्य मनुष्य जन्माला येतो तेव्हाच ठरलेले असते. तरीही आपण राग-लोभ, हेवेदावे,तुझे,माझे करण्यात आणि जीवनाच्या आसक्तीतच अडकून पडलेले असतो. माझा उद्या नक्कीच उजाडेल हे किती सहजपणे आपण गृहीत धरून चालत असतो !!!       साधारण २००७ - २००९ मध्ये झी वाहिनीवर "असंभव" नावाची एक अद्भुत मालिका लागत असे त्याची आठवण आली. तशी ती आत्ताही युट्यूब वर उपलब्ध आहेच. त्याचे शीर्षकगीत असे होते - दिवसामागूनी रात्र धावते, सकाळ संध्याकाळ,  सूत्रधार या साऱ्या चा नाव तयाचे काय ?  काय तयाच्या मनात दडले, न कळे कधी,कुणा क्षणात होते संभव सारे, क्षणापूर्वीचे असंभव!!      खरंच कोण आहे तो सूत्रधार, जो हा जगाचा पसारा निर्विकारपणे चा...

मिसिंग टाइल सिंड्रोम

    डेनीन प्रेगर यांनी 'मिसिंग टाइल सिंड्रोम' असे नाव दिलेली एक मानसिक प्रवृत्ती आहे.      म्हणजे व्यक्ती आपल्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींकडे न बघता नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ती व्यक्ती दुःखी होते, मनातल्यामनात कुढत रहाते.      एखादा सुंदर हाॅल असेल,जो हजारो सुंदर टाईल्स नी मढवलेला असेल पण तेथे एक टाइल लावायची राहिली अथवा तुटली असेल तर तेथे येणाऱ्या लोकांचे लक्ष इतर सुंदर टाईल्स पेक्षा त्या नसलेल्या टाइल कडेच जाते.     तसेच एक सुंदर पोहण्याचा तलाव आहे, तेथेही तशीच एक मिसिंग टाइल आहे. तेथेही तेच !! तिकडेच सगळ्यांचे लक्ष जाते.     म्हणजे माणसे सुख सोडून रिकाम्या जागेकडेच, दुःखा कडेच बघतात. ती एक प्रवृत्ती असते.     कितीही यश मिळले, सुख-समाधान असले तरी इतरांच्या आयुष्याशी तुलना करून दुःखी होतात,उदास होतात. त्यामुळे जगण्यातला आनंद हिरावला जातो,मानसिक ताण वाढतो आणि कशातही समाधान मिळत नाही.     अर्थात सगळ्यांना असेच होते असे नाही पण क्वचित प्रसंगी उगाचच उदास वाटते, असमाधानी वाटते. ...

बाॅम्बे टाॅकीज, मालाड

    मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार या भागात सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय व नायिका देविका राणी यांचा बाॅम्बे टाॅकीज हा सिने निर्मितीचा स्टुडिओ होता. खूप सुंदर बांधकाम असलेल्या ह्या अप्रतिम कलाकृती कालौघात नष्ट पावल्या.      पण तिथून थोडे जवळच देविका राणी यांचा खूप सुंदर बंगला होता. जो सोडून जाताना त्यांनी तो मुंबई महानगरपालिकेच्या कन्या शाळेसाठी दिला. एक अगदी सुंदर इमारत अगदी आत्ता आत्ता पर्यंत वापरात होती. मुली तेथे शिकून प्रगती करत होत्या. मी ही त्या बंगल्याचे सौंदर्य जवळून न्याहाळले आहे. त्यामुळेच जेव्हा त्याला तोडले तेव्हा साहजिकच खूप वाईट वाटले. तुटता तुटत नव्हता म्हणे,एवढे मजबूत बांधकाम होते जुन्या काळचे !!        कालौघात नष्ट झालेल्या अशा अनेक इमारतींची उदाहरणे देता येतील कारण आपल्याकडे विकासाच्या नावाखाली अशा खूप गोष्टी होत आहेत. तर असो...आपण चांगल्याच गोष्टी बघूया.      भारतातील खासकरून दक्षिणेकडील मंदिरे पुरातन आणि कलाकुसरीने भरलेली आहेत.      भारतातील तसेच देशाबाहेरील अशी पुरातन सुंदर मंदिरे प्रवीण मो...

इकिगाई

  आमच्या घरासमोरच्या इमारतीत मेंटेनन्सचे काम सुरू होत आहे. त्यासाठी बांबू बांधणारे कामगार त्यांचे काम करत आहेत, नेहमीप्रमाणेच.. बिनधास्त!!!!     त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,ते कामगार इतक्या उंचीवर  इतके बिनधास्त वावरत होते की अगदी मध्येच एखाद्या बांबूवर झुलत बसून फोनही पाहिला एकदा एकाने असे वाटले, हे सगळे पहाताना इकडे माझ्याच काळजाचा ठोका चुकत होता.    हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा अतिरेक झाला आहे. व्हिडिओ, रिल्स बघता बघता तुमचा वेळ कधी, कुठे आणि कसा जातो याचा पत्ताच लागत नाही.शाॅर्टस तर अगदी कोच पोटॅटो करून टाकतात तुमचा !!!!       असो...     यावर एका ठिकाणी असे वाचले की आपण उपास करतो तसाच आठवड्यातून/महिन्यातून एखादा दिवस तरी सोशल मिडीया न बघण्याचा उपास करून बघायचा.खरोखर कल्पना खूप आवडली. कितपत जमते ते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...     असा उपास ही एक उत्तमच गोष्ट आहे पण अजून एक जपानी संकल्पना आहे ती ही खूप आवडली. ती आहे "इकिगाई"...      इकिगाई म्हणजे "a reason for being"- जगण्याचे कारण...

कौतुक

   "जातस्य हि ध्रुवो मृत्यु:"  ( भगवद्गतगीता  २.२७ )     हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनाच माहित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव नक्कीच मृत्यू पावणार आहे.       हे माहित असूनही बहुतांश लोक, (माझ्यासहित), मी,माझे च करत असतात. राग,लोभ सारख्या षड्रिपूं मध्येच अडकून राहिलेले असतात.       स्वत: पलिकडे माणसाला खरचं काही दिसत नाही कां ??       कधीतरी समोरच्याचे मनापासून कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार कमी वेळेला होताना दिसते.     पल्लवी जोशी निवेदन करत होती तो सारेगमप कार्यक्रम आठवतोय ? किती ती छान बोलत असायची !!! सगळ्यांचे कौतुक तिच्या  शब्दाशब्दातून अगदी ओसंडून वाहत असायचे. भले ते लिहून दिलेले असेल पण किती ते खरे आणि छान वाटायचे. लेखकाचेही कौतुक!!!!!       एकंदरीतच आपण भारतीय माणसे भावना व्यक्त करणे कमजोरपणाचेच लक्षण मानतो असे मला वाटते. असो...       तसे तर नाट्यगृहात ही ते वेगळ्याच प्रमाणात दिसते. पुढच्या रांगांमधील प्रेक्षक माफक प्रतिक्रिया देत असतात. तर श...