Posts

Showing posts from February, 2026

देव पुनः एकदा

     एपिस्टाईन फाईल्स च्या गदारोळामुळे देव आहे की नाही हा संभ्रम मनात तयार झाला. आणि मनानेच त्याला 'तो' आहेच हे ठाम उत्तर दिले.     आहेच की हो तो माणसा माणसात,  माणसातील चांगुलपणात, प्रेमात  !!!!     हल्ली ॲगनाॅस्टीक लोकांची संख्या वाढली असावी असे वाटते कारण कुठे तरी वाचले की एक सर्वेक्षण झाले त्यात म्हणे पन्नास टक्के लोक agnostic निघाले. म्हणजे त्यांना देव आहे ही वाटत नाही आणि नाही ही...न्यूट्रल, निर्विकार  !!!     यात अजून एक सांगायचे म्हणजे अजून एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे अमेरिकेत agnostic लोकांबरोबरच ऐथिस्ट म्हणजे देवाला न मानणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. आणि हे नक्कीच भितीदायक आहे.    कारण देवच नाही मग कसलेही चांगले वाईट काम करताना भिती कोणाचीच उरत नाही. अज्ञातातला देव बघतोय ही संकल्पनाही माणसाला वाईट मार्गापासून परावृत्त करत होती. पण एकदा देव नाहीच मग काय....कसेही वागा.     त्यामुळेच देव हवाच आणि तो आहेच.    पण आपल्याला सध्या तरी घाबरण्याची भिती नाही. कारण मोठ्या दोन तीन पिढ्या अनेक च...

देव

    सध्या सगळीकडेच इपिस्टाईन फाईल्स ची चर्चा चालू आहे. अर्थात त्यातले मला काही कळत नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळेच आजच्या लेखाचा तो विषयच नाही.     फक्त सांगण्यासारखे एक म्हणजे त्यात ज्या लोकांची नावे सगळीकडे चर्चेत आहेत त्यामुळे धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच बसत आहेत तर सांगण्याचा विषय असा की हे सगळे काय चालत आले आहे...मनाला सुन्न करणारे !!!!     अगदी विचार केला तर चेंगीझ खान किंवा त्याआधी पासूनच आणि नंतर ही देशोदेशी झालेले अनेक नरसंहार, ज्यूं चे आणि फाळणीच्या वेळचे नरसंहार आणि आता या फाईल्स मधून उघड होत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे मती कुंठीत झाली आहे, काही कळतच नाहीये....      लहान बाळांपासून स्त्रीपुरूष, म्हातारे कोतारे अगदी सगळ्यांवरचे अत्याचार बघून मन सुन्न होते.    कुठे आहे देव ????? खरंच देव आहे का आणि असेल तर एवढ्या भयानक घटना तो घडूच का देत आहे ??    खरंतर मन विषण्ण झाल्यावर सारासार विवेक बुध्दी जागृत होते. सकारात्मक विचारच केले पाहिजेत व अशा भयानक बातम्यांपासून मनाला लांब ठेवले पाहिजे हे कळत...

कोकण

   आपल्यातील खूप जणांचे मूळ कोकणाशी जोडले गेले आहे त्यामुळे कोकणाबद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जणांचे तर लहानपण तेथे गेले आहे,त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो.जसे की सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये,अमुक दिवशी तमुक करू नये इ.     रात्री झाडाखाली झोपू नये पण खरतर ही अंधश्रद्धा नाही. कारण रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड सोडतात व ऑक्सिजन घेतात त्यामुळे झाडाखाली झोपणाऱ्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो.    जुन्या लोकांना कदाचित सायन्स माहित नसेल पण निसर्गज्ञान होते.    या सर्व गोष्टींमधून सुचलेली एक गंमतशीर गोष्ट!!! मजेत मजेत वाचा आणि सोडून द्या ही विनंती.    लहानपणी असे ऐकलेले की झोपताना तहान लागली तर तसेच झोपू नये नाहीतर तहानलेला आत्मा पाणी शोधत शरीरातून बाहेर पडतो. खरतर डिहायड्रेशन होते हे खरे कारण !!!!    तर, या गावातल्या काकूंना झोपताना तहान लागली पण उठायचा आळस केला आणि झोपून गेल्या.....     झाले !!! रात्री पडला की हो आत्मा शरीरातून बाहेर....    स्वयंपाकघरात गेला तर नेमकी एक कळश...