Posts

Showing posts from July, 2024

अभंगाचा गाथा १२

      जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥ दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥      सगळ्या पत्रावळी झाडून, संतांच्या ज्ञानरूपी उष्टया भोजनाचा आस्वाद घ्या. मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे.आमच्याकडे आपपरभाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीशी उभा आहे. मी संतांच्या उष्टयाची इच्छा बाळगून आहे.म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये.      तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या मनाची ही अपेक्षा पूर्ण केली आहे.  रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी ॥ वीणा कुलकर्णी  🙏🙏

अभंगाचा गाथा ११

       पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥       जे संत पुढे गेले आहेत त्यांचा मार्ग शोधत, त्यांच्या मागे जाऊया. त्यांच्या पावलांच्या धुळीला वंदन करून, त्यांचे उष्टे सेवन करू. त्या मुळे आपल्या पूर्व कर्मांची होळी होईल. हे अनुपम असे ज्ञानाचे भांडवल पदरी बांधून घेऊ व विठ्ठलाला शरण जाऊ. गोविंदाच्या केवळ नामस्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील. जन्म मरणाच्या फेऱ्या संपतील व संत सहवासामुळे हा जन्म सार्थकी लागेल.         तुकाराम महाराज म्हणतात,  या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा  लाभ होईल.  बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,   श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी...

अभंगाचा गाथा १०

         सुखे वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥ आवडीचा मारिला वेडा । होय कैसा म्हणे भिडा ॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥           सुखी असलेली एक बाई आपल्या नवर्‍याला म्हणते, मी सुखी नाही. मी दुःखी आहे. तिच्या आवडीने वेडा झालेला तिचा पती तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती नवर्‍याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे,त्याला पथ्य म्हणून दुधभात, साखर, तूप घालून खावा लागेल. मला दुसर्‍या प्रहराला चक्कर येते व शुद्ध रहात नाही त्यामुळे माझ्या खाली फुले टाकल्यावरच मला झोप येते. त्यात ही आपली मुले जो त्रास देतात तो मला सहन होत नाही. पुढे ती म्हणते, मला सतत डोकेदुखी होते मग मला अ...