अभंगाचा गाथा १२

      जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥ दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥


     सगळ्या पत्रावळी झाडून, संतांच्या ज्ञानरूपी उष्टया भोजनाचा आस्वाद घ्या. मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे.आमच्याकडे आपपरभाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीशी उभा आहे. मी संतांच्या उष्टयाची इच्छा बाळगून आहे.म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये. 


    तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या मनाची ही अपेक्षा पूर्ण केली आहे. 


रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी ॥


वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. राम कृष्ण हरी माऊली वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १०