Posts

Showing posts from April, 2026

बाॅम्बे टाॅकीज, मालाड

    मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार या भागात सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय व नायिका देविका राणी यांचा बाॅम्बे टाॅकीज हा सिने निर्मितीचा स्टुडिओ होता. खूप सुंदर बांधकाम असलेल्या ह्या अप्रतिम कलाकृती कालौघात नष्ट पावल्या.      पण तिथून थोडे जवळच देविका राणी यांचा खूप सुंदर बंगला होता. जो सोडून जाताना त्यांनी तो मुंबई महानगरपालिकेच्या कन्या शाळेसाठी दिला. एक अगदी सुंदर इमारत अगदी आत्ता आत्ता पर्यंत वापरात होती. मुली तेथे शिकून प्रगती करत होत्या. मी ही त्या बंगल्याचे सौंदर्य जवळून न्याहाळले आहे. त्यामुळेच जेव्हा त्याला तोडले तेव्हा साहजिकच खूप वाईट वाटले. तुटता तुटत नव्हता म्हणे,एवढे मजबूत बांधकाम होते जुन्या काळचे !!        कालौघात नष्ट झालेल्या अशा अनेक इमारतींची उदाहरणे देता येतील कारण आपल्याकडे विकासाच्या नावाखाली अशा खूप गोष्टी होत आहेत. तर असो...आपण चांगल्याच गोष्टी बघूया.      भारतातील खासकरून दक्षिणेकडील मंदिरे पुरातन आणि कलाकुसरीने भरलेली आहेत.      भारतातील तसेच देशाबाहेरील अशी पुरातन सुंदर मंदिरे प्रवीण मो...

इकिगाई

  आमच्या घरासमोरच्या इमारतीत मेंटेनन्सचे काम सुरू होत आहे. त्यासाठी बांबू बांधणारे कामगार त्यांचे काम करत आहेत, नेहमीप्रमाणेच.. बिनधास्त!!!!     त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,ते कामगार इतक्या उंचीवर  इतके बिनधास्त वावरत होते की अगदी मध्येच एखाद्या बांबूवर झुलत बसून फोनही पाहिला एकदा एकाने असे वाटले, हे सगळे पहाताना इकडे माझ्याच काळजाचा ठोका चुकत होता.    हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा अतिरेक झाला आहे. व्हिडिओ, रिल्स बघता बघता तुमचा वेळ कधी, कुठे आणि कसा जातो याचा पत्ताच लागत नाही.शाॅर्टस तर अगदी कोच पोटॅटो करून टाकतात तुमचा !!!!       असो...     यावर एका ठिकाणी असे वाचले की आपण उपास करतो तसाच आठवड्यातून/महिन्यातून एखादा दिवस तरी सोशल मिडीया न बघण्याचा उपास करून बघायचा.खरोखर कल्पना खूप आवडली. कितपत जमते ते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे...     असा उपास ही एक उत्तमच गोष्ट आहे पण अजून एक जपानी संकल्पना आहे ती ही खूप आवडली. ती आहे "इकिगाई"...      इकिगाई म्हणजे "a reason for being"- जगण्याचे कारण...

कौतुक

   "जातस्य हि ध्रुवो मृत्यु:"  ( भगवद्गतगीता  २.२७ )     हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनाच माहित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव नक्कीच मृत्यू पावणार आहे.       हे माहित असूनही बहुतांश लोक, (माझ्यासहित), मी,माझे च करत असतात. राग,लोभ सारख्या षड्रिपूं मध्येच अडकून राहिलेले असतात.       स्वत: पलिकडे माणसाला खरचं काही दिसत नाही कां ??       कधीतरी समोरच्याचे मनापासून कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार कमी वेळेला होताना दिसते.     पल्लवी जोशी निवेदन करत होती तो सारेगमप कार्यक्रम आठवतोय ? किती ती छान बोलत असायची !!! सगळ्यांचे कौतुक तिच्या  शब्दाशब्दातून अगदी ओसंडून वाहत असायचे. भले ते लिहून दिलेले असेल पण किती ते खरे आणि छान वाटायचे. लेखकाचेही कौतुक!!!!!       एकंदरीतच आपण भारतीय माणसे भावना व्यक्त करणे कमजोरपणाचेच लक्षण मानतो असे मला वाटते. असो...       तसे तर नाट्यगृहात ही ते वेगळ्याच प्रमाणात दिसते. पुढच्या रांगांमधील प्रेक्षक माफक प्रतिक्रिया देत असतात. तर श...