Posts

Showing posts from June, 2026

इंटरनेट उपवास

     परवा आमच्या वसंत फडके नावाच्या मित्राने निर्जला एकादशी बरोबर इंटरनेट उपवास ही केला. ही सुंदर कल्पना मनाला खूपच भावली कारण हया इंटरनेट विस्फोट झालेल्या काळात या गोष्टींची खरंच खूप गरज आहे.       कारण फेसबुक,वाॅट्स ॲप,इ.इ. मुळे आपण खरंतर आभासी पध्दतीने जोडले गेलोय पण सर्वार्थाने 'जवळ' आलो आहोत का हा प्रश्नच आहे.       कारण फेसबुक वर वगैरे जे दाखवले जाते ते खरंच खरे असते का की नुसता दिखावा असतो ? हे असे म्हणावेसे वाटते कारण सध्या सगळीकडेच चर्चेत असलेली सिया गोयल... तिची सोशल मिडीया वेगळेच काही दाखवत होती आणि घडले काही वेगळेच होते..असो.      तुम्ही कोठेही जा, बहुतेक लोकांच्या हातात फोन असतातच.  बसथांब्यावर, बागेत अगदी दवाखान्यात ही लोक फोन बघत असतात. रस्त्यातून चालतानाही फोन बघत असतात, त्यातूनच माहीम ला एकावर हल्ला झाला. या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणे कमी झाले आहे, सगळे ऑनलाईन लाईव्ह मात्र असतात.     मनोवैज्ञानिकानी हे सगळे काय चालले आहे त्याला नाव दिलेय Loneliness epidemic.     "Six Degrees of S...

Made in India: a TITAN story

    एक अप्रतिम कलाकृती म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे Prime video/MX Player या OTT चॅनेल वर सुरू असलेली ही मालिका.       महनीय जे.आर.डी. टाटांना स्वित्झर्लंड मध्ये ऐकवले गेले की, तुमच्या भारतात चांगली घड्याळे बनणे शक्य नाही.... आणि येथूनच स्फुलींग पेटले आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास. त्या वर विनय कामथ या लेखकांनी वरील पुस्तक लिहिले आणि त्याची बनलेली गोष्ट म्हणजे ही एक उत्तम वेब सेरीज.       या मालिकेतील प्रत्येक अगदी प्रत्येक कलाकर हा त्या भुमिके साठीच बनला आहे इतके उत्कृष्ट काम प्रत्येकाने केले आहे. कुणा एकाचे कौतुक करावे तर दुसर्‍यांवर अन्याय होईल. प्रत्येक पात्राच्या व्यक्तीरेखेत तुम्ही अक्षरशः गुंतून जाता,इतकी प्रभावी कामे केली आहेत.       "टाटा" हे नावच इतके मोठ्ठे, वलयांकित आहे की त्यावर आपण कलाकृती करत आहोत याचे उत्कृष्ट भान निर्मात्या पासून ही मालिका बनवणाऱ्या प्रत्येकाला आहे. आणि ही जाणीव इतकी तीव्र आहे की मालिकेची प्रत्येक फ्रेम केवळ बघत रहावी अशी झाली आहे. अनेकदा आनंदाने शरीरावर रोमांच उभे रहातात तर क...

॥ ईश्वराची दया ॥

   डोळ्यांनी बघतो, ध्वनी परीसतो कानी, पायी पदी चालतो ।     जिव्हेने रस चाखतो,मधुरही  वाचा मुखी बोलतो ।     हाताने बहुसाळ काम करतो विश्रांती ही घ्यावया ।     घेतो झोप सुखे, फिरूनी उठती ही ईश्वराची दया ॥      या एका श्लोकात त्या ईश्वराची किमया सांगितली आहे. किती त्या जगन्नीयंता बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. कारण केवढे ते आश्चर्य आहे, त्या 'अज्ञाता' वर गाढ विश्वास ठेवून आपण गाढ झोपून जातो.. उद्या नक्कीच उठण्यासाठी..     आणि ही त्याची जादूगारी फक्त माणसांबाबतच नाहीये तर जगातील सर्व प्राणी,पक्षी,वनस्पती इ.इ. सगळ्याच सजीव निर्जीव गोष्टींबाबत आहे.       पावश्या पक्षी माहित आहे नां? पाऊस जवळ आला की 'पेरते व्हा' असे ओरडत शेतकऱ्यांना पेरणीचा इशारा देतो. कुठून त्याला हे ज्ञान मिळते की पाऊस लवकरच पडणार आहे.        पाऊस जवळ येण्या आधीच सगळ्याच पक्ष्यांची घरटे बांधण्याची घाई उडते. मुंग्यांचा सुळसुळाट होतो, पावसा आधी वारूळात धान्य भरण्यासाठी !!!       मारूती चित्तमपल्ली...