अनामिक भिती
नरसापूर मधील चिमुरडी च्या भयंकर अत्याचार दुर्घटनेतून जरा सावरतोय तेवढ्यात ट्रेन मधील मयांक लोहार आणि लोहगडावरील केतन अगरवाल दुर्घटना लागोपाठ डोक्यावर आदळल्या. मन विषण्ण झाले आणि विचारशक्ती सुन्न पडली. आणि पुनः एकदा त्या अनामिक भितीने डोके वर काढले. काय चालले हे सगळीकडे ?? अशिक्षिता पासून सुशिक्षिता पर्यंत सगळे तसेच...कुणीच सुसंस्कृत नाही का ? या सगळ्यात एक वाईट गोष्ट घडताना दिसत आहे ती म्हणजे माणसांचा एकमेकांवरील विश्वास ढळू लागला आहे. माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर घरात आम्ही दोघीच.. मी आणि माझी मुलगी. रात्रंदिवस बेचैनी असे. तरूण मुलगी आणि मी ही शेवटी बाईच !! आयुष्यात कधी नव्हे ती बाईपणाची भिती वाटत असे तेव्हा... अनेक वर्षं नोकरीनिमित्त घराबाहेर पडून ही... बॅक, शेअर्स इत्यादी कामासंदर्भात कधीतरी कुणी येत असेच. तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारख्या माणसांची ही गरज असतेच. अर्थात चांगलीच माणसे मिळत गेली आणि भितीही नाहीशी झाली. पण नुसता मोबाईल ला धक्का लागला तर माही...