अभंगाचा गाथा ७

        आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥


       जो आपल्या हितासाठी जागृत असतो, त्याचे आई वडील धन्य आहेत. ज्या कुळामध्ये सात्त्विक मुले मुली जन्माला येतात त्यांच्याबद्दल देवालाही आनंद होतो. अशी मुले गीता, भागवताचे श्रवण करतात आणि विठोबाचे अखंड चिंतन करतात.

      तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर मी खूपच भाग्यवान असेन.


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,  

श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. खूप सुंदर निरूपण केलंय. काल आमच्या नातीच बारस होत त्या कार्यक्रमाची सुरुवात ह्या अभंगाने झाली .धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०